सोयाबीन बाजार भाव कोसळे , शेतकरी चिंतेत .

Share this post

सोयाबीन बाजारभाव घसरले, शेतकरी  चिंतेत. 

mahaagrowon.com  दि.7 मार्च . –

महाराष्ट्रातील  सोयाबीन  बाजारामधे कमालीची घसरण झाली . त्यामुळे शेतकरी  चिंतेत आहे. खरीप हंगामामध्ये पाऊस कमी पडला त्यामुळे उत्पन्नात घट झाली .

सध्या सोयाबीन भावामद्धे दररोज घसरण होत आहे. ऑक्टोम्बर महिन्यात सोयाबीन बाजार भाव 5000 रू . प्रती क्विं. इतका होता . त्यामध्ये घसरण होत आहे.

सध्या महाराष्ट्रातील सर्व सोयाबीन बाजार समितीमध्ये सोयाबीन दर कोसळे आहेत . लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन दर 4300 रू प्रती क्वी. इतका कमी झाली आहे .

सोयाबीन भाव का कोसळले ?

महाराष्ट्रातील दुष्काळ यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे , सध्या मागणी कमी असल्यामुळे भाव कमी होत आहेत . जागतिक बाजारात सोयाबीन मागणी कमी झाली आहे . त्यामुळे सोयाबीन भाव कमी झाले आहेत.

विशेषत: मराठवाडा , विदर्भ  मधील बाजारसमिती मध्ये भाव कमी होत आहे . खालील बाजार समितीमध्ये भाव कोसळले  आहेत .

लातूर –  4350 प्रती क्वी.

अमरावती – 4250 प्रती क्वी.

वर्धा – 4400 प्रती क्वी.

इतका भाव सरासरी मिळत आहे हमी भाव पेक्षा ही दर कमी आहेत. शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची आपेक्षा आहे .

 

 


Share this post

Leave a comment